तारुण्याच्या झळा




                       सिग्नल  बघितलाच असेल तुम्ही ... लाल ,पिवळा आणि हिरव्या दिव्यानी नटलेला . हे तीन दिवे मला तर ना माणसाच्या आयुष्यातल्या तीन टप्प्यांसारखे वाटतात .सर्वात खालचा हिरवा म्हणजे बालपण , वरचा लाल म्हणजे उतारवय आणि मधला पिवळा दिवा म्हणजे तारुण्याचा काळ. आता तुम्हाला प्रश्न पडलाच असेल ह्या आपल्या आयुष्याच्या टप्प्यां मध्ये आणि ह्या तीन दिव्यांमध्ये अस काय साम्य आहे ? तर , हिरवा दिवा असला कि रस्त्यावरच्या गाड्या मुक्त पाने धावायला लागतात , तसच बालपण असत मुक्तपणे जगता येणार  , लाल म्हणजे थांबण  ,उतारवयात सारी अवयव थकून जातात आणि माणसाला थांबायला लागत म्हणून हा लाल रंग , आणि आता पिवळ्या दिव्या बद्दल बोलायचं तर , ह्या पिवळ्या दिव्याला काही महत्व नसल्यासारखं आपण त्याच्याकडे पाहत असतो अगदी तसंच तारुण्यात आलेल्या आमच्या सारख्या मुलांकडे सार जग पाहत असत . "अरे एवढा मोठा गधडा झालास, लहान आहेस का तूला सगळ सांगायला ? लय मोठा झाला का तू ? , तुला काय समजतं ? किंवा मोठ्या माणसांसारख लय समजतंय का तुला? अशी एक ना एक बोलणी रोजच तारुण्यात आलेल्या प्रत्येकाला ऐकून घ्यावी लागतात . अहो फ़्क़्त घरातलाचं कशाला अगदी बाहेर कामाच्या ठिकाणी सुद्धा ह्या तारुण्याच्या झळा सोसाव्याच लागतात , उदाहरण द्यायचंचं  झाल तर " अरे तुम्ही तरुण मुलं , भरपूर काम करायला पाहिजे तुम्ही ,कसे आजारी पडता रे तुम्ही ह्या वयात ?,कसे थकता रे तुम्ही एवढंसं  काम करून, आम्ही आमच्या तरुणपणी किती काम करायचो माहिती आहे का ?  , कशाला पाहिजेत रे तुम्हाला सुट्ट्या?,  तुम्हाला का घर संसार आहे का ? पस्तीसी-चाळीशी नंतर करा कि मजा,आता  तुम्ही लहान आहत .  अशी  अनेक ठरलेली वाक्य  सकाळपासून ते संध्याकाळ पर्यंत ऐकावी लागतात (चं).अशा वेळी मात्र  मनात व्दिधा स्थिती निर्माण व्हायला लागते , आपण खरचं मोठे झालोत कि आपण लहान आहोत ? लहान म्हणून जगायचं तरी बोलन खायचं आणि मोठ म्हणून जगायचं तरी बोलन खायचं अशी अवस्था होते . पण सांगणार तरी कुणाला ? ऐकणारे आहेत तरी कोण ? आणि  ऐकणारे असले तरी समजून कोण घेणार हा प्रश्न असतोच .


जबाबदारी , कर्तव्य , मान-सन्मान , काळजी , अशा अनेक गोष्टींच ओझ घेवून, त्या सांभाळत जगणाऱ्या ह्या तरुण पिढी कडे पाहतो तरी कोण आणि कसा ?   आमच्याकडे फ़्क़्त उनाड , बेशिस्त ,विचारशून्य , स्वताच्या गुंगीत राहणारे अशा नजरेने का पाहता ? खरच  तुमच्या तरुणपणी इतकेच आदर्शवादी राहत होता का ,जितक्याची अपेक्षा तुम्ही करता आहात तितके ? अपेक्षा करण किंवा सांगण काहीच चुकीचं नाहीये , आम्हालाहि तुमच्या मार्गदर्शनाची गरज आहेच , पण किमान आम्हाला समजून तरी घ्या . शेवटी आम्ही हि माणसच आहोत.

 रस्त्यावरची वाहतूक सुरुळीत राहण्यासाठी जशी फ़्क़्त  लाल आणि हिरव्या दिव्याची गरज नाही लागत, लाल आणि हिरव्या दिव्याच्या मध्ये जो  पिवळ्या दिव्यासाठी वेळ दिला जातो तो आयुष्याच्या टप्प्यांमधल्या
दिव्याला अर्थात तारुण्याला पण द्या, उगाच नको फ़्क़्त उठता बसता शब्दांची बोचणी, खुलुद्या दया त्यांच्या विचारांना त्यांच्या स्वताच्या सूर्यप्रकाशात ....आणि बसलेच चटके उन्हाचे तर आहेच की तुमची सावली...ती ठेवूच आम्ही ध्यानात .

-प्रफुल्ल शेंडगे

No comments:

Post a Comment

कृपया तुमच्या प्रतिक्रिया इथे लिहा .... Please give your valuable Comment:-